२६/११
एके दिवशी काय झाले..?? जीवावर उटलेले मारे करी तळाकाठी पोहचले... आणि पथिकाश्रमात राहुन " मुंबई की लेगे जान "वर आराखडे आखले..२६ नोव्हेंबर २००८ रात्री या दिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. छत्रपती शिवाजी टर्मिनस ,लियोपोल्ड कॅफे, कुलाबा ,ताज महाल हॉटेल,ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल,मादाम कामा इस्पितळ,नरीमन हाउस,ओलिस मेट्रो सिनेमा,माझगांव डॉक आणि विले पार्ले अशा लोकप्रिय स्थळी बॉम्बहल्ले घडवुन अनेक परदेशी नागरिक,मुंबई पोलीस ,भारतीय सुरक्षा दल तसेच अनेक सामान्य जनतेचे बळी घेतले. १०दहशतवाद्यांनी मुंबई मध्ये धुमाकुळ घातला. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले.त्यात पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला.तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले..२६ नोव्हेंबर २००८.आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणुन ओळखले जाते.. . " वेळ आली काळ आला सामोरे गेलो त्या संकटा ना , आज ही शाहरे उटतात त्या ताज हॉटेला पाहताना..त