Posts

२६/११

Image
एके दिवशी काय झाले..?? जीवावर उटलेले मारे करी तळाकाठी पोहचले... आणि पथिकाश्रमात राहुन " मुंबई की लेगे जान "वर आराखडे आखले..२६ नोव्हेंबर २००८ रात्री  या दिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. छत्रपती शिवाजी टर्मिनस ,लियोपोल्ड कॅफे, कुलाबा ,ताज महाल हॉटेल,ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल,मादाम कामा इस्पितळ,नरीमन हाउस,ओलिस मेट्रो सिनेमा,माझगांव डॉक आणि विले पार्ले अशा लोकप्रिय स्थळी बॉम्बहल्ले घडवुन अनेक परदेशी नागरिक,मुंबई पोलीस ,भारतीय सुरक्षा दल तसेच अनेक सामान्य जनतेचे बळी घेतले. १०दहशतवाद्यांनी मुंबई मध्ये धुमाकुळ घातला. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले.त्यात पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला.तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले..२६ नोव्हेंबर २००८.आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणुन ओळखले जाते.. . " वेळ आली काळ आला सामोरे गेलो त्या संकटा ना , आज ही शाहरे उटतात त्या ताज हॉटेला पाहताना..त

#माझी मुलाखत

Image
दिवाळी चे दिवस सुरु होते घरात सगळी लगबग सुरु होती. " पोर काय कामाची नाय एक मुलगी झाली असती बर झालं असतं " असं म्हणत pommy बिचारी आपली एकटी कामे पार पाडत होती.रात्री जेवण झाल्यावर तिला म्हंटल सकाळी वेळ आहे का ? तिच्या का ?? म्हणताच मला प्रश्न पडले. मुलाखत हि तिचीच आहे पण विषय माझा आहे. १४ नोव्हेंबर १९९८ चा दिवस भाईंदर,तलावरोड च्या शेजारी च छोटस घर होत आत्या,आजी,मी पपा आणि दादा राहत होतो. आत्या मालकीण बाई असल्या ने सारी कामे माझ्यावरच पडायची. सकाळ नेहेमी प्रमाणे आटपली दुपार आचनक पोटात दुखायला सुरवात झाली.तशीच बाजुवाल्या भाभी ला हाकारत ' साई बाबा हॉस्पिटलमध्ये ' धाव घेतली डॉक्टरांनी तपासायला नकार दिला नाव नोंदवल्या पासून पुढच्या दिवसात एकदाही मी हॉस्पिटल कडे वळली न्हवती, नंतर तितक्यातच मोठी काकी हजर झाली त्या वेळी काकी "विभाग अधिकारी" असल्याने ती च्या दमदाटी नि ०६.०५ मिनिटाला तुझा जन्म झाला . आजी म्हणते तू खूप नशिबवान आहेस माझ्या साठी या मागच कारण मलाही देखील कळल न्हवत पण तिनी सांगितल,त्या सायंकाळी अस काय घडलं ते ज्या ने आज आजी दर पगारा ला न विसरता पैसे द

अ अभिनव चा

Image
१५ जून म्हणजे नेमकं काय तर शाळेचा पहिला दिवस आणि अगोदरचे दोन दिवस म्हणजे सागर रेडिमेंड मधून घेतलेले शालेय गणवेश आणि उज्जव्ल बुक डेपोची पुस्तके अशी काहीशी जून महिन्याची लगबग होती. शाळेचा पहिला दिवस म्हणजे जणु दिवाळीच नवीन बॅग, नवीन कपडे सारं काही नवीन तरी मात्र शाळा आमची जुनीच. जून महिना हा तर केवळ वर्ग बदलण्यातच जायचा, मात्र जुलै महिन्यातील पावसाळ्याचे ते दिवस खूप रमणीय होते. लांबचे शिक्षक येणार नाही त्यामुळे वर्ग एकत्र होऊन जायचे, मग आपला मित्र आपल्या वर्गात येणार त्यासाठी बॅंच अडवून ठेवण्यात वेगळीच मज्जा यायची. गवता मधल्या त्या टाकीत माशे पकडायची गर्दी फारच जमायची. मग सुरु व्हायची पहिली घटक चाचणी असा काहीसा जुलै संपुन आॅगस्ट चालू व्हायचा. आॅगस्ट म्हणजे स्वातंत्र दिनाची तयारी,स्वातंत्र्य दिवस अगोदर पासूनच कार्यक्रमाची रुपरेखा कशी असेल हे सांगून रंगीत तालीम व्हायची. पावसाळी खेळामध्ये सहभागी असल्याने शेवटचे दोन तासिका मधून सुटका मिळायची. सप्टेंबर,आॅक्टोंबर आणि नोव्हेंबर हे मात्र सुट्यामध्ये निघून जायचे. रक्षाबंधन आणि हळदी कुंकू असला की नवीन कपड्यांमध्ये शानमध्ये यायचे. सामही परीक्

तु देशील ना मला साथ ?

Image
प्रेम करीन मी अफाट राग आला तरी मी ताठ तु देशील ना मला साथ..? विसरण्या सारखे क्षण, नाही टिपले आपण आज. सारं ओझ घेऊन डोक्यावर, चीडचीड करशील तु आज. भीती वाटे मला जीवा, मी हरवून जात जाईन. संकटावर मात करण्याचे उपाय तु शोधशील नां ग. तु देशील ना मला साथ..? नाही येणार अश्रु, झटेन मी चोवीस तास. नशिबाच्या प्रसंगावर, करशील ना तु मात. प्रेमाच्या या खेळात जिंकणं आहे माझ स्वप्न तुझी सारी स्वप्न पुर्ण करण हाच आहे माझा ध्यास पण, तु देशील ना मला साथ ?
Image
सकाळ आटपली होती दिवस उजडून अवघे ३ तास ढकले गेले होते.रात्री लवकर झोपत असल्या मुळे सकाळी लवकर डोळे खुलत होते. आचनक, " मी आलो गं आई राउंड मारून " अस म्हणत घराबाहेर पडलो. वातावरण ढगाळ झाल असल तरी उन्हाची झपी लागत होती.वाट रोजची च होती पण मी कुठे जातोय ते सुदडत न्हवत.अचानक एक मनात हाक ऐकायला आली आणि ती त्याचीच हाक होती मी स्तब्ध उभा राहून माझी नजर फक्त त्याच्या कडेच होती.मी मतलबी माणूस त्याचा पुरेपूर वापर करून हली त्याच्याकडे ढुंकून हि नाही पाहिल मला त्याची आठवण येईल म्हणून पाच पाऊल लांबून जायचं मी ठरवले होते.पण आज तोह ओलाचिंब होऊन माझी वाट पाहत होता.मला प्रत्येक अडीअडचणी ला आसरा देण्यात पुढे असायचा.हली माझ्या सोबत बसत नाहीस ?गप्पागोष्टी रंगवत नाहीस ? तुझी मोजकी माणसं पण दिशेणाशी झालीत ? अशी त्याला पडलेले प्रश्न ऐकताच मी निरागस होऊन थोडा वेळ त्याच्या जवळच उभा राहयलो.पुन्हा पावसाच्या सरी सुरु होताच मी त्याच्या कुशीत शिरलो.

शुभेच्छा मान्य

Image
कालच्या दिवसाची सुरवात पारंपरिक पद्धतीने च झाली,आई नी केलेली ओवळणी मात्र कायम लक्षात राहिली.नवीन ट्रेंड च्या नुसार माझ आधी wish,मी ११.५९ लाच फोन केला होता असं आप-आप सात चालुच होते.जिवलग मित्र-मैत्रीण,भाऊ-बहिणी,काही अपेक्षा नि निराशी झाली आणि बरेचशी सवंगडी या सर्वांनी भेटी दिल्यानंतर शेवटी मात्र चाहूल घराकडेच वळली. हा सर्वं दिवसभराचा कालावधी जात असताना अचानक असा मानत प्रश्न दडला कि वाढदिवस का साजरा करायचा ?? एक आठवण म्हणून कि मजा म्हणून कि त्या निमित्ताने सर्वांची भेटीगाठी होत ात म्हणून.आज सगळे नाही पण बहुतेक तर असाच विचार करतात,१० वर्षाचा झालो, १८ वर्ष पूर्ण झाली,५० शी गाठली पण कधी असा विचार केलाच नाही ना.आयुष्यच्या कालावधीत ला एक एक वर्ष कमी कमी होत जातोय ते ? आज येणारा प्रत्येक वाढदिवस आपण सुखा:त आनंदात साजरा करतो.दिवा कधीच विझवत नाही मग केक वर लावलेल्या त्या मेणबत्या का बरं विझवायच्या ? विचारत्मक च गोष्ट आहे जास्त नाही पण थोडा विचार मात्र नक्कीच करूया..! ...... पुरेसा वेळ काढून संगतीने आविसमरण्य क्षण दाखवल्या बद्दल शतश:आभार.  

भूक पाचवी ला पुजलेली असते...?

भूक कशासाठी म्हणे, पोटासाठी ! इथं चांगलं भविष्य मिळेल हा आशावाद उराशी बाळगूण माणुस या पृथ्वी तलावर जन्म घेतो. या पुर्थ्वी तलावर सर्व प्राणीमात्रांची धडपड कशासाठी चालते तर पोटाची भूक भागवण्यासाठी.पहाटे पासुन रात्री झोपे पर्यंत आणि जन्म ल्या पासुन मरे पर्यंत सगळी धावपळ असते ती केवळ भूक भागवण्यासाठी. पोटाची भूक भागली नाही कि गुन्हे,अपराध घडतात पोटाची भूक च माणसाला असे गुन्हे करण्यास भाग पाडते. मंदिर आणि रेल्वे स्थानक समोर पसरले जाणारे हात,त्या मागचा मूळ उद्देश भूक भागवणेच असतो.काही खूप इमानदार असतात पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतंत्र दिवस जवळ येऊ लागला कि झेंडे घेऊन चार चाकीच्या काचा टक-टकून भूकतहान भागवतात.अशी हि माणसाला जनावर बनवणारी भूक आपल्या पूर्वजांनी जाणली होती म्हणून तर आपली संस्कृती सांगते तुझ्याकडे पाच घास असतील,तर त्यातील एक घास तू त्या भुकेलेल्या दे. म्हणुन आज देखील अनेक प्राण अन्ना विना जात आहेत मंदिरा बाहेर गरीबा ला उपाशी ठेऊन मंदिरात नथमस्थक झाल्या नां देव सामर्थ्य देईल का ???